दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या छतावर एक किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बनवून त्यांना 25 वर्ष विज सुविधा उपलब्ध करण्यासाठी च्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवश्य रुप स्टॉप स्मार्ट योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणने पुढाकार घेतलेला आहे तो केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अनुदानामुळे या योजनेतील लाभार्थी ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरावा लागणार आहे
राज्य सरकारने स्मार्ट योजना सुरू केली आहे त्याच बरोबर दारिद्र्य देषेखालील 1.54 आर्थिक दृष्ट्या दुर्बल 3.45 लाख अशा महिला 100 युनिट पेक्षा कमी वीज वापरणाऱ्या 5 लाख घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त विज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी 655 कोटी रुपयांची तरतूद केली आहे
ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर राबविण्यात येणार आहे महावितरणच्या नेतृत्वाखाली झालेल्या संचालक व मुख्य अभियानाच्या राज्यस्तरीय बैठकीत या योजनेच्या अंमलबजावणी बाबत सूचना देण्यात आले आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुर्यनगर मोफत वीज योजना सुरू केली आहे त्यामध्ये ग्राहकांना एक किलो वॅट चा छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी 30 हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून मिळते स्मार्ट योजनेत या अनुदानाखेरीज राज्य सरकारकडूनही अनुदान मिळणार आहे
वीज ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरून प्रकल्प बसविता येईल स्मार्ट योजनेनुसार दारिद्र्य देषेखालील ग्राहकांना एक किलो वॅट चा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून तीस हजार रुपये तर राज्य सरकारकडून 17 हजार 500 रुपये अनुदान मिळेल तसेच सौर ऊर्जा प्रकल्पाची रक्कम भरून ग्राहकांना 25 वर्षे मोफत विजेचा लाभ घेऊ शकतो
काही तुमच्यासाठी स्पेशल आर्टिकल
100 युनिट पेक्षा कमी वीज वापरत असणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल ग्राहकांना ही केंद्र सरकारच्या तीस हजार रुपये अनुदानाअखेरी राज्य सरकारकडून अनुदान मिळणार आहे या गटातील सर्वसाधारण ग्राहकांना 10 हजार रुपये राज्य सरकार कडून मिळतील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या ग्राहकांना सध्या राज्य सरकार 15 हजार रुपये अनुदान देणार आहे एक किलो वॅटच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पातून दरमहा सुमारे 120 युनिट वीज निर्मिती होते यामुळे 100 युनिट पेक्षा वीज वापरणाऱ्या ग्राहकांना गरज स्वतःची गरज भागवून अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते या प्रकल्पातून 25 वर्ष वीज निर्मिती होत असल्याने तेवढा काळ लाभ होतो





