राज्यातील बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना त्याचबरोबर डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या दोन महत्त्वाच्या कृषी योजना आहेत त्या माध्यमातून तुम्हाला नवीन विहिरी विहिरीसाठी विहीर दुरुस्तीसाठी तसेच बोर खोदण्यास अनुदान दिले जाते राज्यातील त्या-त्या जिल्ह्यातील परिषदेच्या कृषी विभागामार्फत ही योजना राबवली जाते या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आदिवासी अनुसूचित जाती प्रवर्गातील तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देणे हा आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो संबंधित लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदान दिले दिले जाते
या घटका करिता मिळणार अनुदान
योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी शेतीतील मूलभूत सोयीसुविधा साठी आर्थिक दृष्ट्या मदत दिली जाते यामध्ये नवीन विहीर तसेच बांधकाम, जुनी विहीर दुरुस्ती, शेतातील पाण्याचे प्लास्टिक आंतरसाठवण, सौर पंप, सूक्ष्म सिंचन, परसबाग पाईपलाईन बसवणे तरफा बांधकाम आणि शेती पंप डिझेल, इलेक्ट्रॉनिक याचा समावेश देखील होतो
या घटकानुसार शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे
घटक निहाय अशाप्रकारे मिळणार : अनुदान योजनेचे घटक आणि अनुदान
- नवीन विहीर चार लाख रुपये
- सूक्ष्म सिंचन संच 90 हजार रुपये
- सोलर पंप 50 हजार
- जुनी विहीर दुरुस्ती 1 लाख रुपये
- शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरण 2 लाख रुपये
- परसबाग /इनवेल बोरिंग /पंप संच 80 हजार रुपये
बोर खोदण्यासाठी 50 हजाराचे अनुदान बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत बोरवेल साठी पन्नास हजार चे अनुदान दिले जाणार आहे या घटक या वर्षी पहिल्यांदाच सुरू करण्यात आला आहे शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन शासनाकडून बोर साठी अनुदान दिले जाणार आहे
योजनेकरिता अर्ज प्रक्रिया व संपर्क माहिती
शेतकऱ्यांनी महाडीबीटी या संकेतस्थळावर जाऊन आपले ऑनलाइन अर्ज सादर करावा अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी गटविकास 3 अधिकारी कृषी अधिकारी पंचायत समिती किंवा कृषी विभाग परिषद गडचिरोली यांच्याशी संपर्क साधावा
↗️ 50 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर
↗️ ठिबक सिंचन अनुदान अर्ज प्रक्रिया
योजनेकरीता पात्रता आणि अटी
डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
- अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध या प्रवर्गातील असावा
- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा अर्जदार अनुसूचित जमातीतील शेतकरी असावा
- दोन्ही योजनेसाठी अर्ज अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर किमान 8.40 हेक्टर कमाल 6. 00 हेक्टर शेती असावी
- अर्जदाराकडे जात प्रमाणपत्र
- 7/12 उतारा आधार क्रमांक आणि बॅंक खात्याची माहिती आवश्यक आहे





