50% अनुदान सोबत सुरु करा हा व्यवसाय .
madhmashi palan 2025 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे राज्यातील शेतकरी बंधुसाठी सदर योजना राबण्यात येत आहे , तसेच यास मध केंद्र असे देखील म्हटले जात आहे . त्याचप्रमाणे सदर योजनेंतर्गत विविध उपक्रम राबवून राज्यातील शेतकरी तरुणांना स्वरोजगार उपलब्ध व्हावा आणि व्यवसायिक गतीविधीमध्ये भर पडावी त्याचप्रमाणे देशाच्या निर्यात क्षमतेत वाढ व्हावी या काही उद्देशाने सदर योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे . तर , सदर योजनेबाबत सखोल माहिती खालीलप्रमाणे कृपया लेख संपूर्ण वाचावा .

सखोल तपशील खालीलप्रमाणे !
सदर योजनेसाठी पात्रता निकष
- सदर योजना मुख्य तत्त्वावर शेतकरी बंधूंना उद्देशून आखण्यात आली असल्याने सदर योजनेस प्रथम प्राधान्य शेतकरी अर्जदारास असेल .
- तसेच अर्जदार जर , सुशिक्षित बेरोजगार असेल तरीही , सुशिक्षित बेरोजगारांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे, यातून त्यांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे .
- आणि , madhmashi palan 2025 योजनेस मधमाशी पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेल्या संस्थांनाही अर्ज करता येणार आहे.
madhmashi palan 2025 , इतर पात्रता तपशील खालीलप्रमाणे
स्वतःची शेती असल्यास प्राधान्य मिळेल . |
अर्जदार वय हे 18 पेक्षा जास्त असावे . |
शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास असणे आवश्यक . |
अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर किमान एक एकर शेती असावी . |
योजनेअंतर्गत भाडेतत्त्वाच्या शेती पद्धती, मधमाशी संवर्धन तंत्रज्ञान, प्रजनन प्रक्रिया आणि मधनिर्मितीच्या गुणवत्ताप्रधान उत्पादनाविषयी सैद्धांतिक व प्रायोगिक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची पूर्णसुविधा उपलब्ध करून दिली जाईल. |
केंद्रचालक संस्था योजनेत संस्था नोंदणीकृत असावी |
१० वर्षांसाठी भाडेतत्त्वावरील एक एकर शेती आदी निकष आवश्यक आहेत. |
अर्जदारास लागणारी आवश्यक कागदपत्रे !
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- शेताचे कागदपत्रे ( सातबारा इत्यादी )
- पासपोर्ट साइज फोटो
- मोबाइल क्रमांक
- बँकेचे पास बुक
- दहावी मार्कशीट
अर्ज कसा करावा तसेच अधिक तपशील कसा मिळेल ?
पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्यातील जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, या पत्यावर संपर्क साधावा, असे आवाहन नागपूरचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनी केले आहे. अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा .
योजनेत पात्र उमेदवारांची निवड आणि इतर तपशील .
सर्वप्रथम सर्व कागदपत्रे पडताळणी झाल्यावर जर अर्जदार सर्व पात्रता नियमात बसत असेल त्याच उमेदवाराची निवड केली जाईल , आणि सदर योजनेत पात्र उमेदवारांना मधमाशी पालन या संबंधित आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल , निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील तसेच वरील प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे .
50% अनुदान विषयी माहिती
योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मधमाशी पालन क्षेत्रातील कौशल्यविकासासाठी विनामूल्य मार्गदर्शन, उपकरणे व साहित्य खरेदीवर अर्ध्या खर्चाचे सबसिडी, सरकारकडून निश्चित किमतीत उत्पादन खरेदी, विशिष्ट आवडीनिवडीच्या आधारे प्रगत प्रशिक्षण संधी तसेच मधमाश्यांचे जतन व पैदास करण्यासाठी समुदायप्रबोधन अभियान अशा बहुआयामी सहाय्यक योजना पुरवल्या जातील. ह्या पहलाद्वारे कृषी उद्योगात नाविन्य आणि टिकाऊ पद्धतींचा प्रसार करण्यावर भर देण्यात आला आहे. मधपेट्या खरेदीसाठी ८०% पर्यंत अनुदान. मध काढणी यंत्र, वॅक्स कलेक्शन, फूड ग्रेड कंटेनर साठीही ४०% पर्यंत अनुदान. प्रशिक्षण व मार्गदर्शन मोफत.उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे.
madhmashi palan 2025 या योजनेतून होणारे उत्पन्न ?
- प्रत्येक एकर क्षेत्रात मधमाश्यांच्या पेट्यांद्वारे वर्षाला ₹50,000 ते ₹60,000 उत्पन्न मिळू शकते.
- मधमाश्यांची संख्या दरवर्षी वाढल्याने, व्यवसाय 3 पटीने वाढू शकतो.
- बाजारात मधाची किंमत ₹400 ते ₹700 प्रति किलो आहे, त्यामुळे 1000 किलो मध विकल्यास ₹5 लाखांपर्यंत नफा मिळू शकतो.
- मधमाश्यांमुळे परागीभवन होऊन पिकांचे उत्पादन वाढते.
- उत्पादन विविधता: मधाश्यांपासून मध, मेण, रॉयल जेली, परागकण, आणि मध विष यांसारखी विविध उत्पादने मिळतात.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ स्थापना व उद्दिष्टे !
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना १४ जानेवारी १९६२ रोजी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी, परंपरागत हस्तकला आणि लघुउद्योगांना संरक्षण देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील स्वरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी करण्यात आली. हे मंडळ महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यरत असून, ग्रामीण विकासाच्या संकल्पनेला साकारण्यासाठी बहुआयामी उपक्रम राबवते. मंडळाचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे खादी, ग्रामोद्योग, हस्तकला आणि कुटीर उद्योगांद्वारे ग्रामीण समुदायांचे आर्थिक सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक संसाधनांचा वापर करून टिकाऊ विकासाला चालना देणे.
या संस्थेच्या कार्यकक्षेत ग्रामीण भागातील कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञानाशी परिचित करून देणे, उत्पादनाची गुणवत्ता वाढवणे, विपणन सुविधा उपलब्ध करून देणे आणि स्वावलंबी उद्योजक तयार करणे यावर भर दिला जातो. मंडळाद्वारे विविध व्यवसायांसाठी (जसे की मधमाशी पालन, मातीची भांडी, हथकरघा, वनौषधी प्रक्रिया, साबण निर्मिती) व्यावहारिक प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात, ज्यामध्ये तांत्रिक मार्गदर्शनासोबतच व्यवसाय व्यवस्थापनाचे धडेही समाविष्ट असतात. शिवाय, उद्योजकांना सुरुवातीच्या टप्प्यात शासकीय अनुदान, सबसिडी, कमी व्याजदराचे कर्ज आणि योजनांतर्गत आर्थिक पाठबळ पुरवले जाते.
मधमाशी पालन योजना – 2025 , योजनेचे उद्दिष्ट .
ग्रामीण भागात मधमाशी पालन व्यवसायास चालना देणे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.पर्यावरणपूरक उद्योगाला प्रोत्साहन देणे. तसेच इतर योजेबाद्द्ल माहितीसाठी येथे क्लिक करा