राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मुलींचा विकास स्वास्थ आणि शिक्षा मध्ये सुधार हवा यासाठी मुख्यमंत्री राज्यस्तरीय योजनेचे सुरुवात केलेली आहे.या योजनेमध्ये एक जून 2016 नंतर जन्म झालेल्या प्रत्येक बालिका जन्मापासून इयत्ता बारावी पर्यंत शिक्षणासाठी सहा टप्प्यात पन्नास हजार रुपये इतकी मदत मिळणार आहे.
मुख्यमंत्री राजश्री योजनेचा उद्देश
या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की, राज्यातील प्रत्येक मुलींना शिक्षण घेता यावे.
या योजनेचा उद्देश असा आहे की, प्रत्येक मुलीला चांगलं शिक्षण मिळावा.
आज काल स्त्रीभ्रूण हत्या होत आहे ,त्यामुळे मुलींचे जन्मदर कमी होत आहे हे सगळं रोखण्यासाठी श्री भ्रूण हत्या थांबवण्याकरिता ही योजना सुरू केली गेली आहे.
मुख्यमंत्री राजश्री योजनेचे लाभार्थी
राजस्थान ची मुख्यमंत्री राजश्री योजना मध्ये एक जून 2016 नंतर जन्मलेल्या सर्व मुली अर्ज करू शकतील.
मुख्यमंत्री राजश्री योजना पात्रता
1. या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार राजस्थान राज्यातील निवासी असला पाहिजे.
2. या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदाराची मुलगी एक जून 2016 नंतर जन्म झालेली पाहिजे.
3. अर्ज करणाऱ्याच्या मुलीचा जन्म सरकारी हॉस्पिटल किंवा दुसऱ्या दवाखान्यात झालेला असावा.
4. अर्ज करण्यासाठी दवाखान्यातील मुलीचा आयडी नंबर लागल.
5. या योजनेत अर्ज करणाऱ्या मुलीच्या आई वडिलांचा आधार कार्ड असावा.
राजस्थान मुख्यमंत्री राजश्री योजनेचे लाभ
या योजनेच्या माध्यमातून दिला जाणारा पैसा एक सोबत नाही दिला जात.जन्म पासून इयत्ता बारावी पर्यंत सहा टप्प्यात निश्चित केलेले पैसे मिळतात.
- मुख्यमंत्री राजश्री योजनेचा पहिले टप्पा मुलीच्या जन्मानंतर अडीच हजार रुपये इतका दिला जातो.
- अडीच हजार रुपयांचा दुसरा टप्पा मुलीच्या एक वर्ष( टीका) डोस पूर्ण झाल्यानंतर दिला जातो.
- चार हजार रुपयांचा तिसरा टप्पा जेव्हा मुलीचे सरकारी शाळेमध्ये ऍडमिशन केले जाते तेव्हा दिला जातो.
- जेव्हा मुलगी इयत्ता सहावी मध्ये जाते त्या वेळेला पाच हजार रुपये चौथा टप्पा दिला जातो.
- योजनेचा पाचवा टप्पा अकरा हजार रुपये जेव्हा मुलगी सरकारी शाळेमध्ये इयत्ता दहावी मध्ये प्रवेश घेते तेव्हा दिला जातो.
- पंचवीस हजार रुपये सहावा आणि शेवटचा टप्पा जेव्हा मुलगी इयत्ता बारावी मध्ये प्रवेश घेते तेव्हा दिला जातो. राजस्थान मुख्यमंत्री राजश्री योजना प्रत्येक घरातील मुलींना शिक्षण मिळावं यासाठी हे मदत केले जाते.