राज्यातील काही भागात मागील दोन-तीन दिवसापासून ढगाळ वातावरण असून काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे तर काही भागात शनिवारी पावसाच्या सरी बरसल्या दरम्यान पुढील चार ते पाच दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या पुढील पाच दिवसासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे या वेळी काही भागात मेघगर्जनेसह पावसाची पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल त्या दरम्यान उत्तर अंदमान समुद्रात म्यनमराच्या किनाऱ्यालगत सोमवार पर्यंत चक्रकार वादळाची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे या वाऱ्याच्या प्रभावामुळे 25 सप्टेंबर हवेचा कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे या चक्राकार वाऱ्यापासून दक्षिण मध्ये महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे दक्षिण उत्तर प्रदेशापासून मराठवाडा पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे राज्यात सर्वात रविवारपासून पावसाची शक्यता आहे या भागात मुसळधार तर काही भागात हलक्या ते माध्यम सरी असतील मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे दरम्यान मुंबईत मागील काही दिवस पावसाने उघड दिल्यामुळे उकाडा सहन करावा लागत आहे तापमानाची काहीशी वाढ झाली हवामान विभागाच्या कुलंबा केंद्रात शनिवारी 30.2 अंशी सेल्सिअस तर सांताक्रुज येथे 31.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली सांताक्रुज येथील तापमान एक अंशाने अधिक नोंदले गेले पावसाचा अंदाज या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता
नाशिक, रत्नागिरी, रायगड,अहील्या नगर पुणे, छत्रपती संभाजी नगर,सोलापूर, बीड,हिंगोली, परभणी,लातूर, धाराशिव
हलक्या ते माध्यम सरी बरसतील
नंदुरबार, धुळे,सिंधुदुर्ग,पालघर ठाणे,मुंबई, जळगाव,कोल्हापूर,सातारा,सांगली