काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील इतर भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले काही ठिकाणी जमीन खरडून गेली तर काही ठिकाणी शेतीतील पीक पाण्याखाली गेले आहे हे नुकसान लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी 31 हजार कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे ही मदत कधी मिळणार याबाबत अनिश्चितता होती आता मात्र याबाबत संभ्रम दूर झाला आहे सरकारने एक आदेश जारी केला असून या आदेशात सरकारने 480 कोटी रुपयांच्या वाटपास मंजुरी दिले आहे म्हणजेच आता शेतकऱ्यांना लवकरच खात्यात दिवाळीची पैसे येण्याची शक्यता वाढली आहे दिवाळीपूर्वीच पैसे वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे
काही जिल्ह्यात 480 कोटी रुपये मंजूर
राज्यामध्ये अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ती वेळ आली शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकार कडून सुरुवात करण्यात आली आहे सरकारने काढलेल्या ताज्या जीआर सरकार काही जिल्ह्यात 480 कोटी रूपये वाटप मंजुरी दिली आहे अमरावती विदर्भातील अकोला वाशिम बुलढाणा आणि संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आला आहे म्हणजेच आता वर नमूद करण्यात आलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळण्याची जास्त शक्यता वाढली आहे
लवकरच सगळ्या जिल्ह्यांसाठी शासन निर्णय जारी होणार आहे आणि नोव्हेंबर सप्टेंबर मधल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनाही मदत केली जात आहे येत्या काळामध्ये आणखीन काही जिल्ह्यातील यांना मदतीस संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तत्पूर्वी सरकारने सध्या मंजूर केलेल्या 480 कोटी रुपयांच्या नियमामुळे काही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यास लवकरच सुरुवात होणार आहे निधी मंजूर झाल्यानंतर आता पुढची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना खात्यात पैसे जमा केले जातील सरकारच्या या जीआर नंतर सरकार पातळीवर घडामोडींना वेग वाढला आहे लवकरच आता शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा केले जातील सर्व नियमाचे पालन करूनच निधीचे वितरण करण्यात यावी असे या शासन निर्णयात सांगण्यात आले आहे