महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर : लातूर,जळगाव, चंद्रपूर आणि सांगली जिल्ह्यात पूर परिस्थिती शेतीचे मोठे नुकसान

rain in Maharashtra राज्यांमधील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे लातूर जळगाव आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पूर आणि अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचेही मोठे प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे लातूर तालुक्यातील उदगीर तालुक्यातील बोरगाव बुद्रुक आणि टाकळी या पूरग्रस्त गावांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान त्वरित वितरित करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत

विदर्भाच्या अनेक भागात विशेषता चंद्रपूर जिल्ह्यातील मुसळधार पाऊस असं वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे या भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचे पाहायला मिळते पंचनाम्याचे काम सुरू आहे तसेच सातारा जिल्ह्यात कायेना धरणासह इतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला कायना धरणाचे दरवाजे गुरुवारी सकाळी तेरा फुटावरून अकरा फुटापर्यंत खाली आणण्यात आले

मात्र सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी इशारा पातळीवरून वाहत असल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे वारणा धरणातून आज सकाळी तर कोयना धरणातून दुपारी पाण्याचा विसर्ग सुरू होणार असल्यामुळे धरण व्यवस्थापनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे

जळगाव जिल्ह्यातील हातनुर धरणातून तापी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू झाले या विसर्गामुळे यंदा पहिल्यांदाच तापी नदीला पूर आला आहे प्रकाशा बॅरेज चे बारा 12 दरवाजे आणि सारंगखेडा चे 10 दरवाजे उघडण्यात आले कढीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे

Leave a Comment