गेल्या दीड महिन्यांपासून राज्यभरात अवकाळी पावसाचे थैमान सुरू असून अनेक ठिकाणी ativrushti nuksan bharpai kyc online अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली असून, घरगुती साहित्य जसे की भांडी, कपडे वाहून गेले आहेत. अशा गंभीर परिस्थितीत राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
30 मे 2025 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय (जीआर) निर्गमित
राज्य शासनाच्या वतीने 30 मे 2025 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीची मदत लवकर मिळावी यासाठी शासनाने प्रत्येक विभागाला अडव्हान्स निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
विभागनिहाय वितरित करण्यात आलेला निधी:
- कोकण विभाग – ₹5 कोटी
- पुणे विभाग – ₹12 कोटी
- नाशिक विभाग – ₹5 कोटी
- छत्रपती संभाजीनगर विभाग – ₹12 कोटी
- अमरावती विभाग – ₹5 कोटी
- नागपूर विभाग – ₹10 कोटी
एकूण निधी: ₹49 कोटी
हा निधी बीम्स प्रणालीद्वारे संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे, जेणेकरून आपत्तीग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवता येईल.
पंचनाम्यानंतर मदतीचा वेग वाढणार
अनेक वेळा मदत जाहीर झाल्यानंतर पंचनामे झाले तरीही निधी उपलब्ध नसल्यामुळे मदतीसाठी विलंब होतो. मात्र, आता अडव्हान्स स्वरूपात निधी उपलब्ध झाल्यामुळे पंचनामा पूर्ण होताच तात्काळ मदत वितरित केली जाणार आहे.
महत्त्वाची माहिती कुठे पहाल?
या निर्णयाचा अधिकृत शासन निर्णय (GR) तुम्ही maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकता.